माणसाच्या अस्तित्वाला आणि त्याच्या समृद्धीला भाषेचा मोठा हातभार लागला आहे म्हणून भाषा जितकी समृद्ध तितका माणसाचा विकास जास्त ! भाषा समृद्ध होण्यासाठी ज्या बाबी महत्वाच्या ठरतात त्यात भाषेच्या शुद्धतेचा क्रमांक खूप वरचा आहे. पण भाषा फक्त शुद्ध असून चालत नाही ती प्रवाही व कर्णमधुर ही असावी लागते. समृद्ध,प्रवाही, माधुर्यपूर्ण व शुद्ध भाषेसाठी कोणत्या किमान बाबींची गरज असते ?
१] किमान नियम अर्थात कमीत कमी व्याकरण.
२] वैविध्यपूर्ण, समृद्ध शब्द भांडार.
या दोन चाकांवर भाषेचा रथ चालला तर तर ती भाषा सार्वलौकिक, सार्वकालिक व सार्वभौमिक होऊ शकते. चला तर मग आपल्या माय मराठीला समृद्ध बनवू या.
१] किमान नियम अर्थात कमीत कमी व्याकरण.
२] वैविध्यपूर्ण, समृद्ध शब्द भांडार.
या दोन चाकांवर भाषेचा रथ चालला तर तर ती भाषा सार्वलौकिक, सार्वकालिक व सार्वभौमिक होऊ शकते. चला तर मग आपल्या माय मराठीला समृद्ध बनवू या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा