पृष्ठे

रविवार, २० नोव्हेंबर, २०११

पौष्टिक `पालक' !

सुट्टीचा वार रविवार. दुपारची घोरती शांतता. कुमारी मनीमाऊ, वय वर्षे ५,आजोबांचा चष्मा इवल्याशा नाकावर टेकवून दोन्ही हातांनी हनुवटीला आधार देवून पालथी झोपून काही तरी वाचत होती. चेहऱ्यावरचे धीर-गंभीर भाव दुपारच्या शांततेत भर टाकत होते.अचानक जाग आल्यावर आजी बाहेर आली. मानसी अर्थात मनीमाऊ झोपली असावी असं समजून आजी तिच्या जवळ गेली तर बाईसाहेब एकाग्रतेने वाचत होत्या."काय वाचतेस माऊ ?" आजीने विचारलं. पहिलं पान दाखवत माऊ म्हणाली," आदर्श बालसंगोपन." आजीच्या विस्फारल्या नजरेचं उत्तर देत ती म्हणाली,"अगं आजी, मला नको का कळायला की माझं संगोपन कसं व्हायला हवं व ते तसं होतंय की नाही ?"

हा एक विनोद असला,वाटला तरी ती काळाची अनिवार्यता आहे. बालकांच्या बालक म्हणून असणाऱ्या व ते बालक आहेत म्हणून त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या समस्या एक मोठी सामाजिक अव्यवस्था निर्माण करत आहेत. बालकांच्या एक व्यक्ती म्हणून होणाऱ्या विकासाला आई-बाप, पालक, कुटुंब, नातेवाईक, शेजारी, मित्र, पर्यावरण, सामाजिक संस्था, शारीरिक मानसिक बौद्धिक आत्मीय  आर्थिक राजकीय सामाजिक असा एकूणच परिवेश कारणीभूत ठरतो.

आपण येथे वरील सर्वांचा विचार करू या. एक सुजाण,स्वस्थ व्यक्ती व समाज निर्माण करण्यात आपापला खारीचा वाटा उचलू या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा